Monday, December 22, 2025

कसं न असं ?

 

सर्व मुस्लिम सत्ताधिश इतके वाईट, हिंदुधर्मा विरुद्ध होते तर त्यांच्या १२०६ ते १८५७ एवढ्या ६००+ वर्षात हिंदुस्थान कसा काय पूर्ण मुस्लिम झाला नाही? अजूनही केवळ १२- १४ % च केवळ मुस्लिम कसे?

बरं यांची सत्ता चांगलीच प्रबळ होती. शिवाजी अन मराठ्यांची सत्ता सोडता कोणता मोठा प्रतिकारही त्यांना झाला नव्हता. औरंगजेबाच्या काळात तर उत्तर  दक्षिण(खालचा काही भाग वगळता) आणि पूर्व पश्चिम (मराठ्यांचे राज्य सोडता) संपूर्ण हिंदुस्थान,  थोडा थोडका नाही तर ४०+ वर्ष औरंगजेबाच्या जुलमी सत्तेखाली होता. तरी कसे बरं ८०% हिंदु शिल्लक राहिले?

बरं याच काळात भक्ती संप्रदाय फोफावला, अनेत संत सर्व भारतभर नांदले, साहित्य निर्माण झालं. वारी सारख्या प्रथा विना अडकाठी सुरु झाल्या, चालू राहिल्या. अनेक देवळांना सरकारी  अनुदानं, जमिनी मिळाल्या.

हे सगळं कसं बरं झालं? 

फारच कमकुवत होते बुवा हे मुस्लिम राज्यकर्ते!


बरं पुढे स्वातंत्र्या नंतर कॉंग्रेस सरकारांनी डावी बाजूच उचलून धरली, मुस्लिमांचं लांगूलचालन केलं, हिंदुंना दबवलं, चुकीचा इतिहास माथी मारला. तर ७० वर्षात हिंदुत्ववादी विचार पूर्णत: नामशेष व्हायला हवा होता न ? झालाच नाही. उलट स्वातंत्र्य पूर्व ३० वर्षात वाढला नाही इतका संघ ७० ( किंवा खरं तर गेल्या ५०)वर्षात वाढला. 

अनेक आर्थिक संस्था खाजगीही झाल्या, नॅशनलाईज्ड झाल्या, सहकारी झाल्या. खरं तर केवळ सरकारीच नियंत्रण असायला हवं होतं न, जर डाव्या प्रभावाखाली असतील तर?

आणिबाणी लागू केल्या नंतर तर सर्व सत्ता इंदिराच्या हाती होती. कशाला आणिबाणी मागे घेऊन निवडणुका घेतल्या. एका हाती सत्ता होती; विरोधकांना दडपणं सहज शक्य होतं की. 

किती कमकुवत राज्य व्यवस्था न कॉंग्रेसची!

Thursday, December 18, 2025

औराच्या निमित्ताने पुन्हा एकदा चार्वाक


Date 18.12.25

सखेगं वरती *** वरून विषय निघालेला. लेखा म्हणाली की त्यांचा ऑरा काही विचित्र आहे - काही विचित्र एनर्जी आहे . तर त्या वरून वरून काही मनात आलं...
-
अनेकांचे औरे असे प्रभावी असतात.
काहींचे काहींना आवडतात - प्रभावी वाटतात- त्यांच्यावर प्रभाव पाडतात. अन काही अशा प्रभावी औरा असणाऱ्या व्यक्ती आपल्या औराचा प्रभाव पाडतही - वापरतही असतात.
इथे मला चार्वाक आठवणं क्रमप्राप्त होतं. प्रत्येकाचा औरा असतोच, कोणाचा कमी कोणाचा जास्ती प्रभावी. तुमच्यामधे औरा
तुमच्या मधे कन्व्हिसिंग कपॅसिटीही असू शकते. पण, ती वापरायची का? कोणा समोर वापरायची? किती वापरायची ? कुठे थांबायचं? यानुसार
प्रत्येक कल्ट ठरतो. रादर हाच बेसिक फरक वाटतो- आस्तिक - नास्तिक यांमधला.
समोरच्याचा औरा प्रभावी आहे म्हणून त्याच्या प्रभावाखाली जायचं का? तो औरा आपल्याला आवडतोय, उपयोगी पडतोय, सुकून देतोय, आधार देतोय, शांती देतोय? नक्की काय देतोय म्हणून आपण तो स्विकारतो आहोत ?
याबद्दलची सजगता असणे महत्वाचे.
चार्वाक या अशा शरण जाण्याला पूर्ण नाकार‍तो. भले समोरच्याचा औरा मला आरामदायक आहे. पण तो मला माझे स्वातंत्र्य देतो आहे का? की माझ्या विचार करण्याच्या, स्वत्वाला
टिकवण्याचा प्रयत्नाला मुभा देतो आहे का ? हे चार्वाक / लोकायत असणे ठरवत असतो.
जो पर्यंत समोरच्याचा औरा माझ्या
बुद्धीला चालना देतो आहे, माझ्या
विचारांना उद्युक्त करतो आहे आणि मला माझी बुद्धी वापरण्याची सक्ती करतो आहे तोवरच त्याचा औरा मी माझ्यावर वर्क करू देईन.
एकदा माझ्यामधे तत्संबंधी
- त्या विषयाबाबत विचार प्रक्रिया सुरू होईल त:क्षणी मी त्याच्या
औरापासून अलग होईन- होऊ शकेन इतपतच त्याचा औरा माझ्यावर
प्रभाव टाकेल. कोणत्याही परिस्थिती मधे माझी विचार करण्याची अन निर्णय घेण्याची क्षमता हरवणार नाही याची सजगता मी सांभाळायला हवी
प्रत्येकाचा स्वत:चा
औरा/बुद्धी/विचार करण्याची क्षमता उच्च असेल असे नाही. परंतु माझ्या आयुष्यात माझा विचार हा महत्वाचा असायला हवा, जसे मानसशास्त्रा
मधे समुपदेशन हे अडचण सोडवण्याची पद्धती सांगण्या पर्यंतच असते. प्रत्यक्ष अडचण ज्याची त्यानेच सोडवायची. तसेच अध्यात्मिक क्षेत्रातही (आपला विचार अन आयुष्य जगण्याची
पद्धत ठरवणे ) हे"स्व" पण जपायला हवं हे चार्वाक सांगतो.

तसच कोणताही विचार / व्यक्ती/कृती
तत्वज्ञान/ गोष्ट,... काहीही १००% बरोबर, खरं, योग्य,... असत नाही. जसे त्यात चांगलं असतं तसच काही न काही हिनकण ही असतात. जर आपण डोळे झाकून सर्वच जसं आहे तसं घ्यायचं ठरवल; तर ते १००% योग्य ठरणार नाही. याचा अर्थ असाही नाही की आपल्याला सर्व १००% समजतं.  नाही!
त्याच मुळे जिथे जिथे शक्य आहे,
जमू शकते तिथे तिथे तरी समोर आहे ते स्विकारण्या आधी आपापल्या क्षमतेनुरूप "का?" हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. मगाशी म्हटलं तसे डोळे झाकून" काहीच स्विकारू नये.
समोरचं कितीही चांगलं दिसत असलं
तरी जेव्हा आपण विचार करती तेव्हा
त्या विचाराच्या भट्टीत त्यातलं जे हिणकस असते आपोआप जळून जाते. जे आपल्यासाठी योग्य नाही जे बाजुला करून जे आपल्या योग्य आहे तितकाच आपण घेतो. अन हेच चार्वाक सांगतो.
या पद्धती मुळे आपल्या मधे रिजिडिटी ही येत नाही. दरवेळी आपला सारासार विचारांचा अग्नी उद्दिपीत असला की आपोआपच समोरचा विचारा सोबत आपल्या मनातला विचार छान तावून सुलाखून निघतो. आपल्याला जास्त पयोगी असा विचार आपण स्विकारत - करत जातो. ही सजगता म्हणजेच इतरांच्या औराचा विचारपूर्वक स्विकार - प्रमाणात स्विकार, अन 'स्व'ची प्रखर जाणीव! 

मग हा औरा असेल, व्यक्ती असेल, मूर्ती असेल, तत्व असतील, धर्माचे तत्वे असतील वा देव असेल. सर्वांसमोर सजगता हाच चार्वाक!

Wednesday, October 15, 2025

 



चार्वाक किंवा लोकायत किंवा नास्तिकवाद या बद्दल फार कमी माहिती असते. अनेकदा यातच बौद्ध अन जैन तत्वांचाही समावेश केला जातो.
वर वर पहाता देव आणि वेदांचे महात्म्य नाकारणारे असे स्वरुप मानले जाते.
पण या सर्वांमधे बरेच फरक आहेत.
यातील फक्त चार्वाक अन लोकायत यांचा विचार आता करते.
वेदकाळात जे तत्वज्ञान मांडले गेले ते तत्वज्ञान न पटणाऱ्या व्यक्ती वा समूहाला चार्वाक म्हटले जाते. ही एकच व्यक्ती होती की समूह होता की काळाच्या ओघात अनेक व्यक्ती होऊन गेल्या याची निश्चित माहिती नाही.
तसेच हे तत्वज्ञान म्हणजे नेमके काय याची एक ग्रंथ मांडणी सापडत नाही. काहींच्या मते चार्वाकाची ग्रंथसंपदा जाळली गेली. काहींच्या मते चार्वाकांमधे शिष्य परंपरा नसल्याने  आणि त्याकाळी प्रामुख्याने मौखिक वाड्मयच असल्याने चार्वाक तत्वज्ञान पुढील पिढ्यांकडे संक्रमित झाले नाही; नष्ट झाले.
मग आज आपल्याला हे तत्वज्ञान कसे कळते? तर वेद, पुराण आणि नंतरच्याही  वाड्गमयामधे चार्वाकांना खोडून काढण्यासाठी आधी त्यांची तत्वे मांडली गेली अन मग त्यावर टिका करून ती खोडून काढली गेली. अर्थातच वेदांना शिष्यपरंपरा असल्याने हे सगळे मुखोद्गत होऊन पुढचे ते लेखी स्वरुपात आले.
तर काहींच्या मते प्रत्येक काळात असे विचार करणारे असतातच जे वेदांना प्रमाण मानत नाहीत. अशा लोकांची शिष्य परंपरा लौकिकार्थाने अन भौतिक स्वरुपात नसली तरी असे विचार उमटत रहातात. अन त्यांची एक खंडिच अशी परंपरा असते.
माझ्या अनुभवावरून सांगते. माझे आधी कधीच असे काही वाचनात आले नव्हते. फक्त बाबा स्वत: नास्तिक होते. तर फर्त माहिती होतं की गेव न मानणारेही असतात. पण बाबांचा स्वभाव इतरांवर प्रभाव पाडणे, आपले मत आग्रहाने सांगणे असा अजिबात नव्हता. अगदीच गरज भासली, समोरून स्पष्ट विचारणा झाली तरच ते आपले मत सांगत असतं. शिवाय आई खूप प्रभावी होती अन ती धार्मीक, श्रद्धा, परंपरांच्या घरातून आलेली. त्यामुळे घरातले वातावरण आस्तिकतेचेच होते.
अशातही साधारण अकरावी बारावीपासून माझी मते तयार होत गेली. प्रत्यक्ष नास्तिकता, चार्वाक वगैरे वाचनात आले ते तर थेट एम ए च्या काळात. सो मूळता माझी बैठक नास्तिक तयार झाली होती. तिला जास्त ठळक, सुस्पष्टता आली ती या वाटनातून.
त्यामुळे (मूळात मी चार्वाकवादी असल्याने) अनुभव समोर होता अन नास्तिकता म्हणजे काय कळल्यावर मीही खऱ्या अर्थाने चार्वाकवादी झाले. कोणतीही परंपरा नसताना.

देव, वेद, श्रद्धा, मान्यता, गुरु  या आणि अशा प्रत्यक्ष सिद्ध न करता येणाऱ्या गोष्टी मान्य नसणे. जे प्रत्यक्षात दिसते, ज्याचा कार्यकारणभाव सिद्ध होतो ती आणि तीच गोष्ट मानणे म्हणजे नास्तिकता. 
कोणतीही गोष्ट मान्य करण्यासाठी पुरावे मागणं म्हणजे नास्तिकता, वा लोकायत. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारणे, उत्तरे मिळवून निशंक होणे म्हणजे नास्तिकता, वा चार्वाक.
खरे तर न हा नकारात्मक शब्दही आम्हाला खटकतो. कारण दे आस्तिक नाही ते एव्हढेच आमचे व्यवच्छेदक लक्षण नाही. उलट प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून बघणं ही अतिशय सकारात्मक आणि कृतिशील (वैचारिक पातळीवर) गोष्ट आहे. पण सर्वच नास्तिक या न लाही सामावून घेतात कारण जे सिद्ध होत नाही ते ते नाकारणं याला आमच्याकडे पर्याय नसतो  ;)
जे समोर सिद्ध करता येते ते मान्य करणे. जे समोर सिद्ध होत नाही ते अमान्य करणे. अन भावी काळात ते सिद्ध झाले तर तितक्याच सहजपणे, निर्ममपणे मान्य करणे. ही काही व्यवच्छेदक लक्षणे.

मुळात ज्ञानप्रक्रियेत कोणाचाही ( देव, वेद, रुढी, श्रद्धा, गुरु,.....) हस्तक्षेप मान्य न करता पूर्णत: बौद्धिकमार्ग अंगिकारणे म्हणजे नास्तिक, चार्वाक वा लोकायत!

माझ्या स्वल्प बुद्धीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यात अजून खूप बारीक सारीक तपशील आहेत, अगदी मला माहित नसणारेही असतील.

सध्या इतकच पुरे!

Sunday, September 21, 2025

चाळीशीत पाऊल टाकणाऱ्या सख्यांना...

 मुलींनो हँग इन देअर. 

चाळीशीच्या आयपास आयुष्याला एक संथपणा येतो. अनेक जबाबदाऱ्या बऱ्याचशा पूर्ण झालेल्या असतात. मुलं पुरेशी सुटी , रादर स्वावलंबी होतात. नवरा त्याच्या मध्यमवयीन गुंतवणुकीत अडकलेला असतो. अन तशात मेनॉपॉज आपली सलगी करू लागतो. एकीकडे शरीरातले हार्मोन्स वेगळा नाच करू लागतात अन दुसरीकडे मनातले न्युरॉन्स वेगळा नाच करू लागतात. या दोघांच्या तालात आपला ताल हरवू लागतो. कधी हा ताल कधी तो ताल मिळवता मिळवता आपला मूळचा तालच हरवू लागतो. एक प्रकारची अस्वस्थता येऊ लागते. त्यातून अत्यावश्यक कामं, जबाबदाऱ्या राहिलेल्या नसतात. मग आपलं मनाच्या तालावर नाचलेलं शरीरही थकतं अन शरीराच्या तालाशी जुळवून घेताना मनही जडशिळ होतं.

अन मग या सगळ्यातून एक निर्विकार निष्क्रियता आपल्या आसपास घोटाळू लागते. त्यातून आसपास मुलं नसली की बायकांचे जन्माचे निधानच हरवते. उणीपुरी २०- २२ वर्ष आपण मुलांच्या रुटीनशी बांधलेले असतो. त्यांच्या प्रायॉरिटीज शी आपला दिवस बांधलेला असतो. हे हळूहळू सुटत जाते. एकीकडे त्याचा अभिमानही असतो पण एकीकडे एक हळवेपणा घेरू लागतो. माझी जगाला असणारी गरज एकदम संपली का अशी अनामिक भावना आपल्याही नकळत मनात कुठेतरी उमटत रहाते. 

आपल्या कामाच्या ठिकाणी आपली गरज जास्त होत असते तर तिथे छान वाटतं. पण जेव्हा मोकळेपणा येतो; मी टाईम मिळतो तेव्हा त्यातं काय करायचं हे कळत नाही. मी टाईम म्हणून ठरवलेल्या अनेक गोष्टी तितक्याशा आनंद देत नाहीत. मेंदुच्या भाषेत बोलायचं तर डोपामाईन पुरेसं मिळत नाही.

हे सगळं सगळं काही काळापुरतं असतं. पण तो काळ असा काही अंगावर येतो की आपला आत्मविश्वास हलू लागतो. अशा वेळी स्वत: वर विश्वास ठेवणं हा सर्वात मोठा उपाय असतो. त्या फेजची गरज म्हणून काही काळ जरूर हे मुरझून जाणं होऊ द्यावं. पण,  पण ज्या क्षणी तुम्हाला हे घडते आहे हे जाणवेल; तेव्हा झटझटून जागे व्हा. ही फेज आहे. माझ्या शरीराची, मनाची गरज आहे, होती. ठिके. पण आता मला यातून बाहेर यायचय. माझ्यातल्या मला शोधायचय. ह्याची मनाशी खूणगाठ बांधा.

सर्वात महत्वाचं म्हणजे माणंसांत रहा. शक्य तर लहान मुलांच्यात रहा. संध्याकाळी मुलं असतील अशा ठिकाणी फिरा. एरवी संगीत, इतर कला उपयोगी पडतात मूड ठिक करायला. पण या स्टेजमधे मला त्याने अजून एकटं केलेलं. कला ही बरीचशी एकांडी असते. तर त्या ऐवजी सोशल व्हा, प्रत्यक्ष भेटा. हाहा हीही करा. नाटकं सिनेमे पहा. बागेत जा. मानाची गरज असते संवादाची, ती भागेल असं काही करा. शरीराची गरज असते न थकता व्यायाम होऊल - शरीराला झेपेल असा व्यायाम तोही सोबतीने करा.

हे मला उपयोगी पडलेले उपाय आहेत.  तुम्ही इथून सुरुवात करा. एखाद वेळेस तुम्हाला वेगळे उपीय उपयोगी पडतील. 

पण एक नक्की. या वयात संवाद - प्रत्यक्ष भेटी अन संवाद जादूसारखा उपयोगी पडतो.

इतका निबंध वाचून बोलावं भेटावं वाटलच तर या🤗घराची, मनाची दारं उघडी आहेत😃

Thursday, April 3, 2025

वेदनेचे गाणे

 सध्या द्वारकानाथ संझगिरींचे " वेदनेचे गाणे" वाचतेय. करोना काळातील विविध घटना- व्यक्ती- अनुभव यांवर आधारित छोटेखानी लेख आहेत. गळ्यात अवंढा आणणारे; अन तरीही सकारात्मक अन काही एक आशा देणारे बहुतांश लेख. 

काही मनात अजून घालमेल उभी करणारे तर काही थांबून, उलटं वळून विचार करायला लावणारे... 

त्या काळातील अनेक न जाणवलेल्या माणसांचा ही मागोवा. 

परंपरा अन संस्कृतीचा कालाचिठ्ठा उलगडत समाजमानसाचा चरचरीत डाग देऊन आपलं सामाजिक भान जागवणारे हे सगळे लेख.

जरूर वाचा.

प्रकाशन - जयहिंद, मुंबई

Friday, January 31, 2025

गोष्टी बंटी अन मनीच्या : १. फुलपाखरु




जेव्हा एखादा हुषार माणसाला स्वत:च्याच बुद्धीला न पटणारं बोलावं लागतं. तेव्हा तो अडखळत बोलतो, अं, यु नो, इट्स लुक लाईक, नाउ लुक, आय विल गिव्ह 2-3 रिजन्स असं म्हणून एखादं आचरटसारखं कारण सांगतो... किती दिवस हा बुडबुडा फुगणारे?

अंतर्गत बाबतीत एकवेळ लोकांना देशभक्ती, ग्रेट संस्कृती या सगळ्याची अफू देऊन गुंगवू शकाल. पण आंतरराष्ट्रीय राजकारणातही हेच होऊ लागलं तर जगात हसं होईल अन गंभीर परिस्थिती उद्भवेल हे या हुषार लोकांना समजत नाही असं नाही, पण पक्ष आणि पक्षप्रमुखांचा इतका दट्या आहे की मग असं चाचरत, अतार्किक बोलत सुटावं लागतं.

आज खरं तर जागतिक राजकारणात भारत एकटा पडत चाललाय. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, चीन, रशिया, इस्राएल हे सशस्त्र मोठे देश आणि पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव या सारखे छोटे शेजारी देशांचीही मैत्री भारत गमावून बसला आहे. मग उगा पाकिस्तानशी गळाभेट करणं. ज्या रशियाला डावे डावे म्हणून अन नेहरुंना त्यांचे पित्ते म्हणून पाण्यात पाहिलं, ज्याचे कझाकिस्तानबरोबर युद्ध थांबवल्याची ग्वाही मिरवली, आज त्याच रशियाशी मैत्री जोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

एका दुसऱ्या घटनेने पूर्ण आंतरराष्ट्रीय संबंधच नव्याने रचायचे हा अतिशय बालिशपणा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात वैचारिक भूमिका, व्यापार, अर्थकारण, शस्त्रास्त्र देवघेव आणि मोठ्या काळातला स्पॅन फार महत्वाचा असतो. 

आज अमेरिकेच्या प्रेमात अन दोन वर्षात रशियाशी मैत्री. आज कझाकिस्तानची बाजू अन वर्षभरात रशियाशी मैत्री. असं आंतरराष्ट्रीय राजकारण करू लागलात तर इतर सर्व राष्ट्र तुमचा विचार कितपत गंभीरपणे करतील याबाबत शंकाच आहे.

ज्या भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अलिप्तराष्ट्र संघटना उभारण्यात पुढाकार घेतला, इतकेच नव्हे तर या संघटनेला अनेक देशांसह बलिष्ट केले. इतके की अमेरिका रशिया शीतयुद्धाला मोठा अडसर उभा केला. आज त्या भारताचे स्थान पार घालवले आहे असं वाटू लागलय.

या साऱ्यातून भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणातली आपली पत पार घालवली आहे असही खेदाने म्हणावं लागतय...