सर्व मुस्लिम सत्ताधिश इतके वाईट, हिंदुधर्मा विरुद्ध होते तर त्यांच्या १२०६ ते १८५७ एवढ्या ६००+ वर्षात हिंदुस्थान कसा काय पूर्ण मुस्लिम झाला नाही? अजूनही केवळ १२- १४ % च केवळ मुस्लिम कसे?
बरं यांची सत्ता चांगलीच प्रबळ होती. शिवाजी अन मराठ्यांची सत्ता सोडता कोणता मोठा प्रतिकारही त्यांना झाला नव्हता. औरंगजेबाच्या काळात तर उत्तर दक्षिण(खालचा काही भाग वगळता) आणि पूर्व पश्चिम (मराठ्यांचे राज्य सोडता) संपूर्ण हिंदुस्थान, थोडा थोडका नाही तर ४०+ वर्ष औरंगजेबाच्या जुलमी सत्तेखाली होता. तरी कसे बरं ८०% हिंदु शिल्लक राहिले?
बरं याच काळात भक्ती संप्रदाय फोफावला, अनेत संत सर्व भारतभर नांदले, साहित्य निर्माण झालं. वारी सारख्या प्रथा विना अडकाठी सुरु झाल्या, चालू राहिल्या. अनेक देवळांना सरकारी अनुदानं, जमिनी मिळाल्या.
हे सगळं कसं बरं झालं?
फारच कमकुवत होते बुवा हे मुस्लिम राज्यकर्ते!
बरं पुढे स्वातंत्र्या नंतर कॉंग्रेस सरकारांनी डावी बाजूच उचलून धरली, मुस्लिमांचं लांगूलचालन केलं, हिंदुंना दबवलं, चुकीचा इतिहास माथी मारला. तर ७० वर्षात हिंदुत्ववादी विचार पूर्णत: नामशेष व्हायला हवा होता न ? झालाच नाही. उलट स्वातंत्र्य पूर्व ३० वर्षात वाढला नाही इतका संघ ७० ( किंवा खरं तर गेल्या ५०)वर्षात वाढला.
अनेक आर्थिक संस्था खाजगीही झाल्या, नॅशनलाईज्ड झाल्या, सहकारी झाल्या. खरं तर केवळ सरकारीच नियंत्रण असायला हवं होतं न, जर डाव्या प्रभावाखाली असतील तर?
आणिबाणी लागू केल्या नंतर तर सर्व सत्ता इंदिराच्या हाती होती. कशाला आणिबाणी मागे घेऊन निवडणुका घेतल्या. एका हाती सत्ता होती; विरोधकांना दडपणं सहज शक्य होतं की.
किती कमकुवत राज्य व्यवस्था न कॉंग्रेसची!