Thursday, December 18, 2025

औराच्या निमित्ताने पुन्हा एकदा चार्वाक


Date 18.12.25

सखेगं वरती *** वरून विषय निघालेला. लेखा म्हणाली की त्यांचा ऑरा काही विचित्र आहे - काही विचित्र एनर्जी आहे . तर त्या वरून वरून काही मनात आलं...
-
अनेकांचे औरे असे प्रभावी असतात.
काहींचे काहींना आवडतात - प्रभावी वाटतात- त्यांच्यावर प्रभाव पाडतात. अन काही अशा प्रभावी औरा असणाऱ्या व्यक्ती आपल्या औराचा प्रभाव पाडतही - वापरतही असतात.
इथे मला चार्वाक आठवणं क्रमप्राप्त होतं. प्रत्येकाचा औरा असतोच, कोणाचा कमी कोणाचा जास्ती प्रभावी. तुमच्यामधे औरा
तुमच्या मधे कन्व्हिसिंग कपॅसिटीही असू शकते. पण, ती वापरायची का? कोणा समोर वापरायची? किती वापरायची ? कुठे थांबायचं? यानुसार
प्रत्येक कल्ट ठरतो. रादर हाच बेसिक फरक वाटतो- आस्तिक - नास्तिक यांमधला.
समोरच्याचा औरा प्रभावी आहे म्हणून त्याच्या प्रभावाखाली जायचं का? तो औरा आपल्याला आवडतोय, उपयोगी पडतोय, सुकून देतोय, आधार देतोय, शांती देतोय? नक्की काय देतोय म्हणून आपण तो स्विकारतो आहोत ?
याबद्दलची सजगता असणे महत्वाचे.
चार्वाक या अशा शरण जाण्याला पूर्ण नाकार‍तो. भले समोरच्याचा औरा मला आरामदायक आहे. पण तो मला माझे स्वातंत्र्य देतो आहे का? की माझ्या विचार करण्याच्या, स्वत्वाला
टिकवण्याचा प्रयत्नाला मुभा देतो आहे का ? हे चार्वाक / लोकायत असणे ठरवत असतो.
जो पर्यंत समोरच्याचा औरा माझ्या
बुद्धीला चालना देतो आहे, माझ्या
विचारांना उद्युक्त करतो आहे आणि मला माझी बुद्धी वापरण्याची सक्ती करतो आहे तोवरच त्याचा औरा मी माझ्यावर वर्क करू देईन.
एकदा माझ्यामधे तत्संबंधी
- त्या विषयाबाबत विचार प्रक्रिया सुरू होईल त:क्षणी मी त्याच्या
औरापासून अलग होईन- होऊ शकेन इतपतच त्याचा औरा माझ्यावर
प्रभाव टाकेल. कोणत्याही परिस्थिती मधे माझी विचार करण्याची अन निर्णय घेण्याची क्षमता हरवणार नाही याची सजगता मी सांभाळायला हवी
प्रत्येकाचा स्वत:चा
औरा/बुद्धी/विचार करण्याची क्षमता उच्च असेल असे नाही. परंतु माझ्या आयुष्यात माझा विचार हा महत्वाचा असायला हवा, जसे मानसशास्त्रा
मधे समुपदेशन हे अडचण सोडवण्याची पद्धती सांगण्या पर्यंतच असते. प्रत्यक्ष अडचण ज्याची त्यानेच सोडवायची. तसेच अध्यात्मिक क्षेत्रातही (आपला विचार अन आयुष्य जगण्याची
पद्धत ठरवणे ) हे"स्व" पण जपायला हवं हे चार्वाक सांगतो.

तसच कोणताही विचार / व्यक्ती/कृती
तत्वज्ञान/ गोष्ट,... काहीही १००% बरोबर, खरं, योग्य,... असत नाही. जसे त्यात चांगलं असतं तसच काही न काही हिनकण ही असतात. जर आपण डोळे झाकून सर्वच जसं आहे तसं घ्यायचं ठरवल; तर ते १००% योग्य ठरणार नाही. याचा अर्थ असाही नाही की आपल्याला सर्व १००% समजतं.  नाही!
त्याच मुळे जिथे जिथे शक्य आहे,
जमू शकते तिथे तिथे तरी समोर आहे ते स्विकारण्या आधी आपापल्या क्षमतेनुरूप "का?" हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. मगाशी म्हटलं तसे डोळे झाकून" काहीच स्विकारू नये.
समोरचं कितीही चांगलं दिसत असलं
तरी जेव्हा आपण विचार करती तेव्हा
त्या विचाराच्या भट्टीत त्यातलं जे हिणकस असते आपोआप जळून जाते. जे आपल्यासाठी योग्य नाही जे बाजुला करून जे आपल्या योग्य आहे तितकाच आपण घेतो. अन हेच चार्वाक सांगतो.
या पद्धती मुळे आपल्या मधे रिजिडिटी ही येत नाही. दरवेळी आपला सारासार विचारांचा अग्नी उद्दिपीत असला की आपोआपच समोरचा विचारा सोबत आपल्या मनातला विचार छान तावून सुलाखून निघतो. आपल्याला जास्त पयोगी असा विचार आपण स्विकारत - करत जातो. ही सजगता म्हणजेच इतरांच्या औराचा विचारपूर्वक स्विकार - प्रमाणात स्विकार, अन 'स्व'ची प्रखर जाणीव! 

मग हा औरा असेल, व्यक्ती असेल, मूर्ती असेल, तत्व असतील, धर्माचे तत्वे असतील वा देव असेल. सर्वांसमोर सजगता हाच चार्वाक!

No comments:

Post a Comment