Sunday, May 5, 2024

आजची गरज

सुधारकांची सिरिज लिहिते आहे त्यामागे काही विचार आहे.  त्याकाळात विभागलेला समाज जोडण्यासाठी शिक्षण, समाज सुधारणा, जातीभेदांचे खंडन असा गोष्टी या सुधारकांनी केल्या. सर्व समाजाला एकत्र करून पुढे नेले. म्हणून तर आपल्या समाजात स्त्रीशिक्षण, बालविवाह बंदी, विधवापुनर्विवाहाला चालना, सर्वांना शिक्षण, सर्वांना नोकरीव्यवसायाची संधी, जातीभेद नष्ट होत गेला.
जेव्हा जेव्हा समाजात दुफळी माजवली जाते, भेदाभेद अधोरेखित (हायलाईट)  केला गेला तेव्हा तेव्हा इथला समाज गर्ततेत गेला. अन जेव्हा जेव्हा समाज एकोप्याने चालला, एकमेक भेद असून- ते स्विकारून, हे विश्वची माझे घर ही बंधुत्वाची भावना घेऊन चालला तेव्हा तेव्हा आपला समाज जास्त घट्ट बनला, जास्त सुधारलेला झाला.
इतिहास हे सतत सांगतो अन तरीही आपण पुन्हा पुन्हा समाजातल्या दुफळीला वर काढतो. 
यातून कोणाचा नक्की फायदा होतो? ज्या समाजातल्या घटकाला आपण वेगळे काढू पहातो, तो घटक हजारो वर्ष आपलाच आहे न? शरीराचा एखादा भाग दुखावला,जास्त अटेंक्शन मागू लागला तर तो तोडून टाकतो का आपण? की त्याला योग्य ते अटेक्शन देऊन, त्याची नीट देखभाल करून त्याला सुधारतो?
करोडो लोकांमधल्या काहींनी चुका केल्या म्हणून त्यांच्या सगेसोयऱ्यांसकट त्यांना समाजबहिष्कृत करणार का, रादर करू शकणार का आपण? अन मग असे हाताची बोटं दुखावली म्हणून हातच छाटून टाकून सशक्त समाज बनणार का आपण?
अन चुका कोणाकडून होत नाहीत? प्रत्येक व्यक्ती कधी न कधी चुकते. समाजाचा प्रत्येक घटक कधी न कधी चुकतो.
दलित वर्गाला उच्चवर्णीयांनी चुकीची वागणूक दिलीच न? मग उच्चवर्णीयांना छाटून टाकलं का समाजाने?
सॉरी कोणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, कोणी दुखावले गेले तर माफीही मागते🙏🏻
पण समाजातली ही दुफळी अजिबात बघवत नाही, जीव कासावीस होतो. म्हणून लिहिलं. विष भराभर पसरत चाललय, त्यावर उतारा केवळ प्रेमाचा आहे, सहानुभूतीचा आहे, सहसंवेदनेचा आहे! 
एकमेकांना सावरूत, मदत करू. सनातन धर्म हेच सांगतो, विश्वबंधुत्व सांगतो.

No comments:

Post a Comment