Pages

Monday, June 26, 2023

आवडती जुनी गाणी: 13. चैन से हमको कभी...

 

काही  गाणी अशी असतात कि विसरू म्हणता विसरता येत नाहीत. मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात रुतून बसतात, कित्येक हळवे क्षण त्या गाण्याशी जोडलेले असतात. तसंच हे एक गाणं!

पण या गाण्याचे वेगळेपण असे की त्याने अनेक हळवे कोपरे तयार केलेत मनात. कितीतरी क्लेषकारक आठवणी, घटना, गुपितं, अफवा या गाण्याच्या आसपास भीरभीरत असतात... 

कवी एस एच बिहारी यांचे शब्द, कसे मधाळ होऊन मनाला चिरत जातात. एकापाठोपाठ एक विसंगती येत राहातात अन मनातला एक एक "चैन" विस्कटून टाकतात. सुखांन जगू देत नाहीत; ना सुखाने मरू देतात. पाहिलंच कडवं पहा, चंद्राच्या रथात बसून, रात्रीची नवविवाहिता येतेय, पण देतेय काय तर "ताडपण्या"चं अविनाशी दु:ख! यातल्या पुढच्या दोन ओळी मूळ गाण्यात हरवल्यात. पण दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात आशाने त्या गायल्यात...प्रेमाच्या जळत्या जखामांच्या उजेडात, आपल, वेगळं होणं अजूनच ते अजूनच वाढणार आहे , याला काय म्हणायचं? दुःखाच्या डागण्या? अन बरं, हे गाताना कुठेही राग नाही, नुसताच आतल्या आत जाळत जाणं... 

शेवटी, हे वेगळे होण्याऐवजी मरण आलं  असतं तर जीवाला जरातरी सुकून मिळाला असता... हेही असाच काळीज चिरत जातं... 

इतके जीव ओतून दुःख सादर करणारे बिहारी... सादर प्रणाम!

आता सगळ्यात अवघड गोष्ट. संगीतकार ओ पी नय्यर साहेब आणि गायिका आशा भोसले. या दोघांनीं कितीतरी गाणी दिली आपल्याला. अगदी दिल खुश करून टाकणारी. मन उत्साहित करणारी, म्हणतात न मूड बदलून टाकणारी बबली गाणी.पण आता त्यांची आठवण नको... आज फक्त चैन से हम को कभी... 

असं म्हणतात कि, कााही कारणांनी लता मंगेशकर आणि ओ पी नय्यर यांच्यात मानमुटाव झाला. त्यात अजून, एका कार्यक्रमा संदर्भात  काही गैरसमज झाले. त्यातून लता आणि आशा यांच्यात बोलणी झाली. तर काही म्हणतात आशाच्या मुलीला ओ पी काही बोललेले... काय झालं कोण जाणे. पण ओ पी आणि आशा या दोन सुरील्या मैत्रीत वाणवा  पेटला. दोघांची मनं पार दुखावली. हे सगळं घडत होतं तेव्हाच "प्राण जाय पार वाच न जाय"(1974) या चित्रपटाची गाणी करणं चालू होतं. यातीलच एक गाणं चैन से हम को कभी... हे गाणं रेकॉर्ड झालं. ओ पी आणि आशा दोघांच्याही मनातले दुःख जणू यात बिहारीजींनी मांडलेेलं ... हे गाणं या जोडगोळीचं एक फार वेगळं गाणं, अन तितकच अप्रतिम!

पण सुरुवातीला म्हटलं न, काही गाणी आपलं वेगळचं नशीब घेऊन जन्माला येतात; तसच या गाण्याचं. या चित्रपटाचे निर्मात कि दिग्दर्शक यांना हे गाणं फार संथ वाटलं. चित्रपट ऍक्शन पट. त्याची कथा अन चित्रणामध्ये या गाण्याचा समावेश करावा असं काही त्यांना वाटेना. गाणं रेकॉर्ड होऊनही चित्रपटात ते घेतेलंच गेलं  नाही. पण गीताची  स्वतःची क्षमता इतकी; कि तरीही फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये त्याला उकृष्ट गीत म्हणून पुरस्कार मिळाला. अर्थातच आशा काही या बक्षीस समारंभाला गेली नाही. तिचं पारच मन उतारलेलं. अखेर ओ पी नय्यर यांनी ते बक्षीस घेतलं. पण आशा पर्यंत ते पोहोचलं, नाही? कोणास ठाऊक... 

ओ पी - आशा जोडी संपली ती संपलीच... अजून कितीतरी गोड गाणी झाली असती पण... त्या त्या गाण्यांचे नशीब नव्हते हेच खरे. या नंंतर आशा कधीच ओ पी नय्यर यांच्याकडे गायली नाही. अन ओ  पींच्या करियरची  उतरती कळा सुरू लागली. एका सुंदर गाण्याने एका अतिसुंदर मैत्रीचा शेवट झाला... 

तर हे ते गाणं. मुद्दाहून सगळे गीतही देते. आणि दोन लिंक्सही. एक मूळ रेकॉर्ड झालेलं पण चित्रपटात न आलेलं. अन दुसरं दूरदर्शन मध्ये एका कार्यक्रमात आशाने गायलेलं. काही जागा वेगळ्या जरूर आहेत. पण दोन्ही गाणी तितकीच मनाला चिरत जाणारी... !

 ---

चित्रपट:  प्राण जाय पर वचन न जाय (1974)

संगीतकार: ओपी नैय्यर

गायिका: आशा भोसले
गीतकार : एस एच बिहारी

चैन से हमको कभी, आपने जीने ना दिया

ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया

चैन से हमको कभी... 


चांद के रथ में रात की दुल्हन जब जब आएगी

याद हमारी आपके दिल को तडपा जाएगी

प्यार के जलते जखमोंसे जो दिलमे उजाला है 

अब तो बिछडके और भी जादा बढने वाला है

आपने जो है दिया, वो तो किसीने ना दिया

ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया

चैन से हमको कभी... 


आपका ग़म जो इस दिल में दिन-रात अगर होगा

सोचके ये दम घुटता है फिर कैसे गुज़र होगा

काश ना होती अपनी जुदाई मौत ही आ जाती

कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती

इक पल हँसना कभी दिल की लगी ने ना दिया

ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया

चैन से हमको कभी... 

मूळ गीत:


दूरदर्शनवर सादर झालेले गीत:



No comments:

Post a Comment